हिंदू विवाह हा वेदकाळापासून चालत आलेला आहे. 'अनंता 'वै वेदा:' म्हणजे वेद अनादी आहेत. जी गोष्ट प्र चीन आहे, ती जगन्मान्य आहे. ब्रह्मदेवाने वेदाची रचना पुरूषसूक्तामध्ये केली आहे. वेदांमध्ये प्रत्येक मानवावर १६ संस्कार केले जा वेत असे म्हटले आहे. त्यातील विवाह हा १५ वा संस्कार आहे. विवाह ह्या शब्दाची व्युत्पत्तीवि + वह अशी आहे. विशिष्ट मार्गाचे जीवन, कुळ, समाज वाहून नेणे असा याचा अर्थ आहे. सहधर्माचरण, सहनशीलता, संयम, सहकार्य, निष्ठा व कर्तव्यदक्षतेचे एक व्रत म्हणजे विवाह विवाह हा हिंदूंचा 'संस्कार' आहे, 'करार' नाही. त्यामुळे विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रद्धेचेही बरेच वरचे स्थान आहे. सांस्कृतिक पातळीवर विवाहबंधन हे अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक विधिंबरोबरच एक 'कार्य' या दृष्टीनेही समारंभप्रिय लोक लग्नाकडे खूप हौशीने पहातात. मराठी लग्नाचे मूळ महत्वाचे धार्मिक विधी व त्यामागची विचारपरंपरा यांची माहिती या विभागात दिलेली आहे.
पत्रिका जुळल्या आणि नवरा नवरींची एकमेकांची पसंती झाली की वधू वरांच्या कुटुंबीयाकडील लोक लग्न 'पक्के' करण्यासाठी हा विधी करतात. पूर्वी या विधीला 'कुंकू ला वणे' म्हणत. अगदी पूर्वी ह्या विधीला अजिबात महत्व नव्हते. परंतु त्याविषयी धार्मिक वधी व मंत्र मात्र अस्तित्वात आहेत. प्रथम वराचा पिता चार नातेवाईक व प्रतिष्ठित लोकांना घेऊन कन्येच्या पित्याकडे जातो व आपल्या मुलासाठी त्यांच्या कन्येला वि वाहाची मागणी घालतो. कन्येचा पिता घरच्यांची व मुलीची संमती घेऊन होकार कळ वतो. सर्वांच्यादेखत वरपिता व वधूपिता हा विवाह निश्चित झाल्याचे जाहीर करतात. ह्याला वाङनिश्चय म्हणतात. म्हणजेच या विवाहाचा तोंडी व्यवहार पक्का झाला. हा विधी काही ठिकाणी गुरुजींमार्फत संस्कृतमधून होतो.सहकार्य, निष्ठा व कर्तव्यदक्षतेचे एक व्रत म्हणजे विवाह विवाह हा हिंदूंचा 'संस्कार' आहे, 'करार' नाही. त्यामुळे विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रद्धेचेही बरेच वरचे स्थान आहे. सांस्कृतिक पातळीवर विवाहबंधन हे अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक विधिंबरोबरच एक 'कार्य' या दृष्टीनेही समारंभप्रिय लोक लग्नाकडे खूप हौशीने पहातात. मराठी लग्नाचे मूळ महत्वाचे धार्मिक विधी व त्यामागची विचारपरंपरा यांची माहिती या विभागात दिलेली आहे.
सर्व साधारणपणे मुंज, विवाह यासारख्या मंगलकार्याच्या आधी घरी ग्रहमख हा विधी करण्याची पद्धत आहे. (वेळेअभा वी ग्रहमखाचा नुसता संकल्प सोडून कार्य झाल्यानंतरही तो करता येतो.) या विधीमध्ये मंगल कार्याला नवग्रहांची अनुकूलता (शांती) मिळविणे हा उद्देश असतो. हा पूर्णतः धार्मिक विधी असतो व लग्नाच्या एक किंवा दोन दिवस आधी घरीच केला जातो. ह्या दि वशीच वधूला चुडा भरण्याची प्रथा आहे. हिरवा चुडा भरल्यावर वधूने घराबाहेर पडायचे नसते. 'केळवण' हा कार्यक्रमही याच दिवशी होतो. केळवण म्हणजे वधू अथवा वराला लग्नाआगोदर दिलेली मेजवानी.
कोणत्याही शुभकार्याला मेंदी लावणे हा खरा | राजस्थानातला रवाज. पण आता तो महाराष्ट्रातही अमाप लोकप्रिय | झाला आहे. मेंदीची पाने वाळवून वाटून केलेल्या पावडरीमध्ये निलगिरीचे तेल घालून ती पाण्यात भिजवून त्याचे कोन तयार करतात. या कोनाच्या सहाय्याने वधूच्या तळहातापासून ते मनगटापर्यंत व हाताच्या पाठीमागच्या भागावरही, तसेच पावलांवर घोट्यापर्यंत नाजुक कलाकुसरीची मेंदी काढली जाते. वधूचे सौंदर्य खुलविण्यासाठी ही मेंदीची प्रथा आहे. मेंदी काढणा-या खास स्त्रिया असतात. तसेच सौंदर्यगृहातूनही अशा प्रकारची सेवा उपलब्ध होते. मेंदीचा कार्यक्रम हा बहुधा लग्नाच्या दोन दिवस आधी केला जातो. वधूबरोबरच लग्नासाठी जमलेल्या व हाडातील स्त्रियांनाही मेंदी काढतात. मेंदी रंगल्यावर वधूला चुडा भरतात. चुडा म्हणजे हिर व्या रंगाच्या साध्या कांचेच्या बांगड्या, त्यावर कोणतेही सोनेरी नक्षीकाम नसते. चुडा भरताना एकेका हातात सात सात किंवा नऊ नऊ बांगड्या घालतात. त्यासाठी लग्नाच्या मंडपात कासारालाच बोलाविण्याची पद्धत आहे. वधूचे चुडा भरणे झाल्यावर व हाडातील इतर स्त्रियांनाही आवडीनुसार हिरव्या बांगड्या भरतात. हिंदूंच्या दृष्टीने हिरव्या बांगड्या व कुंकू हे सौभाग्याचे लक्षण आहे.
लग्नाच्या सुरुवातीला विधीपूर्वक धान्य कांडणे या विधीला 'घाणा भरणे' असे म्हंटले जाते. हा समारंभ वधूच्या घरी तसेच वराच्या घरीही लग्नाच्या दिवशी साजरा केला जातो. हल्ली हा समारंभ कार्यालयातच होतो. आंब्याच्या पानांनी तसेच हळदीत बुड वलेल्या स्वच्छ चिंधीने किंवा जाड धाग्याने मुसळ सुशोभित केले जाते. पाच सुवासिनी व वधू / वर यांचे मातापिता मिळून उखळात तांदूळ, गहू, तीळ अशाप्रकारचे धान्य घालून कांडतात व कांडताना वधू व वर यांच्या मातापित्यांना उद्देशून मंगल ओव्या म्हणतात. खेडेगावातून, हे कांडलेले धान्य पुन्हा सुशोभित जात्यावर दळून वड्यांच्या पिठात घालण्याची पद्धत आहे. यानंतर घाणा भरणाऱ्या सुवासिनींना हळदी कुंकू लावून त्यांची खणानारळाने ओटी भरण्याची पद्धत आहे. घाणा भरून झाल्यावर वधू / वर व तिचे / त्याचे आई वडील यांना पाटा वर बसवून सुवासिक तेल उटणे लावतात. हा विधी लग्नाच्या दि वशीच सकाळी सुरवातीला होतो. या कार्यक्रमापासून सनई चौघडा अशी मंगल वाद्ये वाजविण्याची पद्धत आहे.सहकार्य, निष्ठा व कर्तव्यदक्षतेचे एक व्रत म्हणजे विवाह विवाह हा हिंदूंचा 'संस्कार' आहे, 'करार' नाही. त्यामुळे विवाहाला सामाजिक संदर्भाबरोबरच भावनिक व श्रद्धेचेही बरेच वरचे स्थान आहे. सांस्कृतिक पातळीवर विवाहबंधन हे अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक विधिंबरोबरच एक 'कार्य' या दृष्टीनेही समारंभप्रिय लोक लग्नाकडे खूप हौशीने पहातात. मराठी लग्नाचे मूळ महत्वाचे धार्मिक विधी व त्यामागची विचारपरंपरा यांची माहिती या विभागात दिलेली आहे.
यानंतरचा महत्वाचा विधी म्हणजे हळद लावणे. हा विधीही लग्नाच्या दिवशीच सकाळी करतात. तेल उटणे लावून झाल्यावर वधू व तिचे आई वडील यांना हळद लावतात. हळदीची पूड पाण्यात कालवून ती चेहरा व हातपायांना लावण्याची पद्धत आहे. त्यावेळी प्रसंगानुरूप गाणीही गातात व नंतर त्यांना मंगल स्नान घालतात. त्यानंतर कालवलेल्या हळदीतील उरलेली हळद ( उष्टी हळद) घेऊन पाच सुवासिनी वाजत गाजत वराच्या बिऱ्हाडी जातात. तिथे वराला व त्याच्या आई वडिलांना हळद लावून स्नान घातले जाते. वधूपक्षाकडून हळद घेऊन येणाऱ्या सुवासिनींची खणा नारळाने ओटी भरून, फराळाचे पदार्थ देऊन आदरातिथ्य होते. वरपक्षाकडून वधूला हळदीची म्हणून उंची साडी देण्यात येते.
पूर्वीच्याकाळी लग्नविधी वधूच्या घरी होत असे. त्यासाठी वर व त्याचे वऱ्हाडी वधूच्या गावी येत असत. वराचे गावाच्या सीमेवर स्वागत करण्यासाठी वधूचे आई वडील जात व तिथे त्याचे पूजनही केले जाई. त्या पूजेला 'सीमांत पूजन' असे म्हणतात. हल्ली लग्ने बहुधा कार्यालयातच होत असल्यामुळे हा विधी लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री केला जातो. वधूच्या आई वडिलांकडून वराची पूजा केली जाते व त्याला उंची नवे कपडे दिले जातात. बरमाईचेही पाय धुवून तिला साडी देण्यात येते. 'सीमांतपूजनाचे वेळी वधूला मोठी विवाहित बहीण असल्यास तिच्या पतीचाही सन्मान करण्यात येतो. याला 'ज्येष्ठ जावई पूजन' म्हणतात. त्यानंतर वराचे आई वडील वधूला कुंकू लावून एखादा दागिना देतात व उंची साडी देतात. वधूने ती साडी परिधान करून पुन्हा पूजेच्या जागी यावयाचे असते. वरमाई वधूची पाच फळांनी ओटी भरते. यानंतर रात्रीच्या जेवणाचा समारंभ होतो. काहीजणांकडे यावेळी कढी भाताचे जेवण देण्याची पद्धत आहे.
पूर्वीच्याकाळी लग्नविधी वधूच्या घरी होत असे. त्यासाठी वर व त्याचे वऱ्हाडी वधूच्या गावी येत असत. वराचे गावाच्या सीमेवर स्वागत करण्यासाठी वधूचे आई वडील जात व तिथे त्याचे पूजनही केले जाई. त्या पूजेला 'सीमांत पूजन' असे म्हणतात. हल्ली लग्ने बहुधा कार्यालयातच होत असल्यामुळे हा विधी लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री केला जातो. वधूच्या आई वडिलांकडून वराची पूजा केली जाते व त्याला उंची नवे कपडे दिले जातात. बरमाईचेही पाय धुवून तिला साडी देण्यात येते. 'सीमांतपूजनाचे वेळी वधूला मोठी विवाहित बहीण असल्यास तिच्या पतीचाही सन्मान करण्यात येतो. याला 'ज्येष्ठ जावई पूजन' म्हणतात. त्यानंतर वराचे आई वडील वधूला कुंकू लावून एखादा दागिना देतात व उंची साडी देतात. वधूने ती साडी परिधान करून पुन्हा पूजेच्या जागी यावयाचे असते. वरमाई वधूची पाच फळांनी ओटी भरते. यानंतर रात्रीच्या जेवणाचा समारंभ होतो. काहीजणांकडे यावेळी कढी भाताचे जेवण देण्याची पद्धत आहे.
लग्नाच्या दिवशी सर्वप्रथम होणारा धार्मिक विधी म्हणजे 'देवक बसविणे'. वधू आणि वर यांच्याकडे स्वतंत्ररित्या ते बसवले जाते. 'देवक' म्हणजे संरक्षण. पुण्याहवाचनाचा वधी करताना वधूपिता, वधूमाता व वधू पूर्वेकडे तोंड करून बसतात. हाच क्रम मुलाकडेही पाळला जातो.यावेळी देश, काल वगैरे उच्चारून मंत्र म्हणतात व त्याचा उद्देश वधूपिता व वर पिता यांचे देवऋण फिटावे, धर्माज्ञेप्रमाणे वधूवरांनी प्रजोत्पादन केल्याने परमेश्वर संतुष्ट व्हावा असा असतो. देवकासाठी एका सुपात दुहेरी धाग्याचे सूत गुंडाळलेला नारळ ठेवतात. कुलदेवतेचे स्मरण करून अविघ्न कलशाची स्थापना करतात. २७ सुपा यांवर मातृका देवता व आंब्याच्या पानांच्या ६ देवतांनी नन्दिनी आदि देवतांना आवाहन करण्यात येते. लग्नकार्य जिथे होणार तो मंडप संरक्षित व्हावा हा त्यामागचा हेतू आहे. एका समिधेला आंब्याची पाने उलटी बांधतात. २७ देवतांची स्थापना तांदूळ, गहू पसरून केली जाते. हे सूप देवापुढे ठेवले जाते. सुपामध्ये अविघ्न कलश म्हणून मातीचे सुगड वापरण्यात येते. मातीचे सुगड का तर आपले जीवन मातीच्या घड्यासारखे आहे याचे ते द्योतक आहे. ते व्यवस्थित हाताळले तर आनंद उ पभोगतो येतो. घड्याशी खेळले तर तो भंग पावेल. देवक स्थापनेपासून देवकोत्थापन करेपर्यंत त्या कार्याशी संबंधित असणाऱ्यांना सोयर सुतक इ. व्यावहारिक नियम लागू होत नाहीत आणि कार्यात बाधा येत नाही. देवक बसते त्याच वेळी घरचे लोक व नाते वाईक, वधू/वर आणि त्यांच्या निकटवर्ती कुटुंबियांना आहेर देतात. याला 'घरचा आहेर' म्हणतात.
लग्नघटिका जवळ आलेली असताना वधू गौरी हराची म्हणजे शंकर पार्वतीची पूजा करते. यासाठी बाळकृष्ण व अन्नपूर्णा यांच्या छोटयाशा मूर्तीची पूजा केली जाते. बाळकृष्ण हे शंकराचे व अन्नपूर्णा हे पार्वतीचे प्रतिक आहे. पूर्वी वधूच्या राहत्या घरातील देवधरात ही पूजा होत असे. हल्ली ती कार्यालयातील एका खोलीत करतात. पूर्वी पूजा मांडण्यासाठी दगडी पाट्याचा वापर होई. पाट्यावर हळदीने गौरीहराची प्रतिमा काढून तांदुळाच्या राशींवर शंकर पा र्वतीच्या (म्हणजेच बाळकृष्ण व अन्नपूर्णेच्या) छोटया मूर्ती ठेवतात. काहींकडे फक्त अन्नपूर्णेचीच चांदीची मूर्ती ठेवतात. एक छोटी तांदुळाची रास, इंद्रपत्नी 'शची' हिचे प्र तीक म्हणून मांडतात. 'इंद्राच्या पत्नीला जसे विवाह भाग्य मिळाले, आरोग्य लाभले व पुत्रप्राप्ती झाली, तसेच मलाही मिळो' अशी प्रार्थना वधू 'शची 'ला, करते. तो श्लोक असा आहे
प्रत्यक्ष लग्न जिथे लागणार त्या जागी दोन लाकडी पाट समोरासमोर (पूर्व व पश्चिम दिशेस) मांडून त्यावर तांदुळाच्या राशी घालतात. त्यावर कुंकवाने स्वस्तिके काढतात. या जागेला लग्नवेदी म्हणतात. एका पाटावर वरास पुष्पहार देऊन उभे करतात. वधूचा मामा वधूस हाताला धरून घेऊन येतो व दुसन्या पाटावर उभे करतो. लग्नाचे वेळी मुलीला मामाने आणण्याचे कारण असे सांगतात मामा हा मायेचा असतो. लग्नकार्याच्या दिवशी मुलीचे आई वडील, काका हे आल्या गेल्याचे स्वागत करण्यात व्यग्र असतात. त्यामानाने मामा मोकळा असतो. शिवाय मुलीला आजोळची ओढ ही जास्त असते. आणि सर्वसाधारणपणे काकापेक्षा मामाच अधिक माया करतो.
याचा अर्थ असा की ‘चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध करताना, यज्ञयागादी कार्य करताना, द्र व्यार्जन करीत असताना कल्याणकारी कार्यक्रम करीत असताना मला तुझ्या सहाय्याची आवश्यकता आहे. हे विधान वधू व वर या दोघांनीही एकमेकांना उद्देशून म्हणायचे असते.
हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे व त्यावर आधारित कायद्यानुसार कन्यादान, विवाहहोम व सप्तपदी हे तिन्ही विधी झाल्याशिवाय विवाहविधी पूर्ण झाला असे मानले जात नाही. विवाह सनातन धर्मविधीप्रमाणे झाला की वैदिक पद्धतीने झाला त्यानुसार या विधींचे क्रम मागेपुढे होतात.
याचा अर्थ असा की ‘हे पतिव्रते, पतीच्या (म्हणजे माझ्या) जीवनाला कारण असे हे मंगलसूत्र मी तुझ्या गळ्यात बांधतो. तू माझ्यासह शंभर वर्षे सुखाने संसार कर वर हे वाक्य पत्नीला (नववधूला) उद्देशून म्हणतो. ह्यानंतर वधूसाठी सासरहून आणलेले सर्व अलंकार सासरच्या मानकरणी, करवल्या वगैरे तिच्या अंगावर चढवतात व नूतन वि वाहित दांपत्याकडून पुरोहित गणपतीचे पूजन करवितात.
यानंतरचा विधी म्हणजे मंगलसूत्र बंधन. वधू वरांना पूर्वेकडे तोंड करून बसवून वरपक्षाकडील ज्येष्ठ मानाच्या सुवासिनी वधूला कुंकू लावून एक भरजरी त्याचबरोबर साजेशी चोळी, दुसरे एक रेशमी भारी वस्त्र, व मणि ) मंगळसूत्र देतात. मंगळसूत्र म्हणजे काळ्या मण्यांची पोत. (पूर्वी ही सुताच्या धाग्यात ओवत व ती नव-यामुलाच्या उंचीइतकी असे.) त्यात माहेरकडून सोन्याची एक वाटी व दोन मणी आणि सासरकडून सोन्याची एक वाटी व दोन मणी असे वराने काळ्या मण्याच्या पोतीच्या मध्यभागी गुंफायचे असतात. हल्ली मात्र मणीमंगळसूत्र हे काळ्या पोतीसह सोन्यात गुंफलेले असते. मग वधू नवीन दिलेली रेशमी साडी नेसून येते व परत वराशेजारी बसते. वर ते मणी मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधतो व आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून म्हणतो
एक सौभाग्यचिन्ह, सौंदर्यप्रसाधन व पूजाविधीतील एक आवश्यक मंगल पदार्थ. बव्हांशी हिंदू कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया कुंकवाचा वापर करतात. कुंकू कपाळावर लावतात, तसेच केसातील भांगामध्येही घलतात. इतर धर्मांच्या स्त्रियांत कुंकू लावण्याची प्रथा दिसत नाही. कुंकूमम् या संस्कृत शब्दावरून मराठीत कुंकू हा शब्द आला. मूळ शब्दाचा अर्थ 'केशर' असा आहे. कुंकू लावण्याची ही प्रथा केव्हा सुरू झाली हे सांगता येणार नाही, तरी पण जुन्या वाङ्मयातील उल्लेखांवरून ही प्रथा महाभारतकाली अस्तित्वात होती असे दिसते. काहींच्या मते ही प्रथा आर्येतरांकडून उचलली, असे मानतात. इतर काही लोक या प्र ाथेचा संबंध पशुबलीशी लावतात. पशूला मारून त्याच्या रक्ताचा टिळक नववधूस ला वून गृहप्रवेश करण्याची प्रथा एके काळी दक्षिणेतील आर्येतर जातीत होती. या प्रथेचे रूपांतर कालांतराने कुंकू लावण्याच्या प्रथेत झाले असावे.
मंगलसूत्रबंधनानंतर लगेच वरानेनवपरिणित वधूसह होम करायचा असतो. तोच वि वाहहोम विवाहहोमाच्या पाच देवता आहेत. त्यांना या होमाने आवाहन केले जाते. वि वाहहोमानंतर केला जातो तो लाजाहोम. लाजाहोमाच्या तीन देवता असतात. या देवतांना आवाहन करून लाजाहोम केला जातो. या होमात लाह्यांची आहुती देतात म्हणून त्याला लाजाहोम म्हणतात. (लाजा म्हणजे लाह्या.)
या होमासाठी वर लग्नवेदीवर ( बोहल्यावर) चढून पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसतो. वधू त्याच्या उजवीकडे पाटावर बसते. समोर स्थंडिल म्हणजे होमपात्र व पाण्याने भरलेला सुशोभित कलश ठेवला जातो. होमपात्राच्या पश्चिमेला पाटा व वरवंटा आणि ईशान्येला साळीच्या ( भाताच्या) लाह्यांची परडी ठेवली जाते. उत्तरेला तांदुळाचे सात पुंजके पूर्वपश्चिम मांडले जातात. नंतर वर समिधा हातात घेऊन स्थलकालाचा उच्चार करून विवाहहोमाचा संकल्प सोडतो.
'हे अग्ने, मी स्वीकारलेल्या या वधूला भार्यात्व यावे व गृहयाग्नी सिद्ध व्हावा म्हणून मी लाजाहोम करतो. तू आम्हांला अन्न दे, बल दे, पुत्र दे, धन दे' असे वर म्हणतो वह प्रज्ज्वलित करतो. होमात तूप टाकून वर 'अग्नये पवमानाय, इदं न मम', असे म्हणतो. गुरुजी यावेळी अग्नीचे व प्रजापतीचे पाच मंत्र म्हणतात.
नंतर वर उठून वधूचा उजवा उताणा हात आपल्या उजव्या हातात घेऊन 'मी तुझे पाणिग्रहण करतो आहे. त्याप्रमाणे भग, अर्यमा, सविता व पूषा या चार देवांनी गृहस्थाश्रमाकरता आपणांस एकत्र आणले आहे' असे म्हणतो.
अग्निप्रदक्षिणा हा स्वतंत्र विधी नसून लाजाहोमाचाच पुढील व मुख्य भाग आहे. होमासाठी वर व वधू वि वाहवेदीवर बसतात त्यावेळी पुढे स्थंडिल म्हणजे होमपात्र व पाण्याने भरलेला आणि आह्ह्व्यापल्लव, फुले आदींनी सुशोभित केलेला कलश असतो. त्यांतील उदक उपाध्यायांनीमंत्र म्हणून पवित्र केलेले असते. सर्व लाह्या धगधगत्या होमकुंडात पडल्यानंतर वर उठून उभा राहतो व होमकुंड आणि उदक कलश यांना म्हणजेच अग्नीला प्रदक्षिणा घालतो. तो वधूचा हात आपल्या हातात घेऊन पुढे चालतो. वधू त्याचा हात धरून त्याच्या मागे चालते. प्रदक्षिणा पुरी झाल्यावर वधू होमकुंडाच्या पश्चिमेस ठेवलेल्या पाट्यावर ( किंवा सहाणेवर) पाय ठेवून उभी राहते. वर मंत्र म्हणतो, 'हे वधू, तू या पाषाणाप्रमाणे दृढ (घट्ट) हो. आपल्या हितशत्रूंचा सद्वर्तनाने नाश कर.' (मैत्रीपूर्ण सोज् वळ वागणुकीने शत्रूंनापण जिंकून घे असा भावार्थ. )
लाजाहोमानंतरचा विधी म्हणजे सप्तपदी. होमाच्या उत्तरेकडे मांडलेल्या तांदुळाच्या सात राशीं वरून वराने वधूला चालवायचे असते. एकेका राशीवर एकेक पाऊल व तेही उजवे पाऊल ठेवायचे. ही सात पावले म्हणजेच सप्तपदी. प्रत्येक पाऊल ठेवल्यावर वर पुढील मंत्र किंवा त्या अर्थाचे वाक्य म्हणतो.
पहिले पाऊल - हे वधू, तुझे-माझे सख्य झाले आहे. तू अन्नदात्री व दीर्घायू संततीची माता हो.
दुसरे पाऊल - हे वधू, तू दोन पावले चालली आहेस म्हणून मला बलवर्धक हो.
तिसरे पाऊल - हे वधू, तू तीन पावले चाललीस, आता मला धन देणारी हो.
चवथे पाऊल - हे वधू, चार पावले चाललीस, आता माझी सुखबर्धिनी हो.
पाचवे पाऊल - हे बधू, तू पाच पावले चाललीस, आता संततिवर्धक हो.
सहावे पाऊल -हे वधू, तू सहा पावले चाललीस म्हणून सहाही ऋतूंत प्राप्त होणारे भोग देणारी हो.
सातवे पाऊल - हे वधू, तू सात पावले (माझ्याबरोबर) चालली आहेस. यास्तव माझी दृढ सखी हो..
सप्तपदी झाल्यानंतर वर वधूच्या मस्तकाचा आपल्या मस्तकाला स्पर्श करतो आणि मंगल कलशातील उदक आपल्या व वधूच्या मस्तकी लावतो. शांती असो, तुष्टी असो, पुष्टी असो असे म्हणतो. यानंतर वधूच्या पायात चांदीची जोडवी घातली जातात. त्यावेळी करवलीने वधूच्या पायाचा अंगठा हाताने दाबायचा असतो. सप्तपदी झाली की शास्त्रोक्त विवाहविधी पूर्ण झाला.
यानंतर विवाहानिमित्त जमलेल्या सर्व पाहुण्यांना मिष्टान्न भोजन व त्यानंतर विडे दिले जातात. वधू वर आणि वरमाई आणि वराचे वडील, बहीण, भाऊ इत्यादींची खाशी पंगत बसते. त्या वेळी वधूने बराला व वराने वधूला घास देण्याची पद्धत आहे. पूर्वीच्याकाळी स्त्रियांनी आपल्या पतीचे नाव उच्चारण्याची पद्धत नव्हती. परंतु लग्नामध्ये मात्र विविधप्रसंगी पतीचे नाव अर्थपूर्ण अशा दोन किंवा चार ओळींच्या उखाण्यात गुंफून घेण्याची प्रथा होती. आजलाही ही प्रथा पाळली जाते. घास देताना वधू वर असे उखाणे रचून वधू वराचे व वर वधूचे नाव त्या गुंफतो. यावेळी आसपासची तरूणमंडळी वधूवरांची चेष्टा मस्करीही करतात.
एका वेताच्या मोठ्या टोपलीत कणकेचे हळद घालून केलेले दिवे ठेवतात. त्यात तेल, वाती घालून ते पेटवितात. त्याला झाल म्हणतात. नंतर गुरुजी काही मंत्र म्हणून वराच्या वडीलधा या मंडळीना बोलावितात. वधूचे आई वडील वराचे आई वडील, काका, मामा, आजोबा वगैरे ज्येष्ठ व्यक्तींच्या डोक्यावर झाल धरतात व सर्वांच्या साक्षीने आमची मुलगी तुमच्या घरात दिलेली आहे. तिची जबाबदारी आता तुमची आहे असे सांगतात. यानंतर वधू सासरी जाण्यास निघते. हा प्रसंग सर्वात भावनाप्रधान असतो. जन्म देऊन लाडाकोडाने वाढविलेली लाडकी मुलगी आपल्याला कायमची अंतरणार या कल्पनेने वधूच्या माता पित्यांचा कंठ दाटून येतो. वधूपक्षातील सर्वच नातेवाइकांचे विशेषतः स्त्रीवर्गाचे डोळे पाणावतात. वधूही माता पित्यांना कायमचे सोडून जाण्याच्या कल्पनेने कमालीची भावविवश होते. साश्रुनयनांनी सर्वांचा निरोप घेऊन ती पतीगृही जाण्यास निघते. जाण्याआधी वधूची मालत्यांनी ओटी भरतात व गौरीहर पूजेत ज्या बाळकृष्णाची व अन्नपूर्णेच्या मूर्तीची तिने पूजा केलेली असते त्या मूर्तीही तिला सासरी नेण्यासाठी दिल्या जातात.
घरात येणा या नववधूला हिंदुधर्मानुसार लक्ष्मी मानले जाते. त्यामुळे वराच्या घरी तिचे अत्यंत उत्साहाने व आदराने स्वागत होते. वधू वरासह व हाडातील इतर स • र्व मंडळी वरगृही आली की वधूवरांवरून दहीभात ओ वाळून त्यांची दृष्ट काढतात. प्रवेशद्वाराच्या उंब याजवळ तांदूळ भरून एक माप ठेवलेले असते. नववधूने ते आपल्या उजव्या पायाने लवंडून देऊन मग आत जावे अशी पद्धत आहे. त्यामागे कल्पना अशी की' हे वधू, लक्ष्मीच्या रूपाने तू या घरात आलीस. धान्याच्या रूपाने या घरात तू समृद्ध हो, हे घर समृद्ध कर.' मग त्या जोडप्यास देवघरात नेऊन देवाच्या पाया पडवितात. घरातील वडील मंडळींच्या पाया पडवितात व वधूस घरातील कोणास अगदी लहान मुलांसह काय हाक मारायची वगैरे सांगतात. मग दोघांकडून लक्ष्मीपूजन करवितात व नवरीचे नाव बदलून दुसरे ठेवायचे असल्यास ह्याच वेळी ठेवतात. ताम्हनात तांदुळाची रास घेऊन सोन्याच्या अंगठीने वर ते नाव लिहितो. उपस्थित मंडळींस साखर वाटून नवीन नाव सांगतात.
सासूने सुनेचे मुखानलोकन करण्याचा हा विधी आहे. हिंदू धर्मात कोणत्या मांडीवर कोणी बसा वे याचे विवेचन आहे. उजवी मांडी ही अपत्यासाठी असते. घरात नव्याने आलेली सून हे अपत्य म्हणून सासूने स्वीकारायचे असते. यावेळी सासूच्या एका मांडीवर सुनेला बसवितात आणि एका मांडीवर मुलाला बसवितात. सासू दोघांचेही काहीतरी गोड पदार्थ मुखात घालून आनंद दर्शविते. त्यानंतर सासूने आरशात सुनेचे मुखावलोकन करायचे असते. तिला आरशात पहाण्याचे कारण म्हणजे अलंकृत केलेल्या मुलीच्या रूपाला दृष्ट लागण्याची शक्यता असते, परंतु प्रतिबिंबाला दृष्ट लागत नाही. याचवेळी सासूने पूर्णतः नव्या वातावरणात व घरा माणसात आलेल्या सुनेला आपल्या नजरेतून धीर द्यायचा अशी पद्धत आहे. आता सुनेला आईची माया देण्याची जबाबदारी सासूवर आली असाही याचा अर्थ आहे.
अनेकांनी लिहीली काव्ये गायली
सौंदर्याची महती काल होते युवती
आज झाले .... ची सौभाग्यवती